Saturday, 31 March 2018

आठवणी

कोल्हापूर कृषि महाविद्यालयात शिकत असतानाच्या संटेपणातील अनेक आठवणी आहेत. खरे तर आपल्याच कॉलेजच्या मुली म्हणजे वर्गभगिनी . बहिणींचेही भावावर निर्व्याज्य प्रेम असते.  पण आपल्या बैचच्या नशीबात तेंव्हा तेखील सुख नव्हते. राजाराम कॉलेजच्या आवारातून  जाताना अशा अनेक भगिनी दिसत असत. पण सोबत त्यांच्या त्यांच्या ओळखीचे कोणी भाऊ, दादा असल्याने, आमची नियत नेहमी साफ असल्याने, ओझरत्या नजरेच्या पल्याड आमची मजल कधी गेलीच नाही. त्यात अवतार असा बेंगरूळ की पायात स्लीपर्सही  कधी धडाचे नसत.  कशाची नजर वर करून पाहतोय अन काय?
पण त्यातही काहीजण वागायला - बोलायला अतिशय स्मार्ट होते.  अन दिसायलाही  एकदम चकोट .त्यांना मात्र हे साधत असे. पण त्यांच्या दृष्टीने ती  निखळ मैत्री असे.  खोट असेल म्हणाल तर ती आमच्याच नजरेत काहीशी. पण  यामुळे आमची नजर दूषित नाही झाली कधी.  असेल कुणी आमच्याही नशीबी. ना इंद्राच्या दरबारीची रंभा, ना उर्वशी, ना  मनातली परी पण निदान बरी तरी.


*👆काहीतरी आठवणी वेळ काढून लिहा*
😁😁😁😁😁😁😁

No comments:

Post a Comment

आठवणी

कोल्हापूर कृषि महाविद्यालयात शिकत असतानाच्या संटेपणातील अनेक आठवणी आहेत. खरे तर आपल्याच कॉलेजच्या मुली म्हणजे वर्गभगिनी . बहिणींचेही भावावर...